खरी धनसंपन्नता.... आपले आरोग्य....

             प्रत्येकाला वाटत असतं की आपण नेहमी निरोगी राहवं. पण त्यासाठी स्वतःची घ्यावी लागणारी काळजी ही दुस-या करुन चालणारी नसते. ती आपल्यालाच करावी लागते. मग त्यासाठी काय काय करावे लागते, हे आपण इंटरनेट वर शोधतो की कोणाला ना कोणाला विचारतो. मग एक ना धड भाराभार चिंध्या.

             प्रत्येकजण काही ना काही वेगळं सांगतात आणि आपण त्या त्यानुसार वागायला सुरुवात करतो. प्रत्येकाचे शरीर, त्यासाठी लागणा-या अन्नाची Quantity, त्या अन्नाला पचवण्याची क्षमता वेगवेगळीच असते. एकाच Diet  दुस-याला काटेकोरपणे जमणे अशक्य आहे.

    कोणाला कधी काय suit होईल आणि काय होणार नाही, हे समजून घेण्यासाठी तज्ञांचा सल्ला नक्कीच आवश्यक असतो.

     गेल्या वर्षी १३ डिसेंबर २०१४ रोजी अंधेरीच्या शहाजी राजे क्रिडा संकुल मध्ये डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी (एम. डी) ह्यांनी "आपले आरोग्य" ह्या विषयावर उचित आणि अत्यंत बहुपयोगी मार्गदर्शन केले. आणि मुख्य म्हणजे त्यानुसार हळूहळू स्वतःला बदलवण्याचा प्रयास केला. माझ्याही नकळत कधी त्या बदलांचा सकारात्मक फरक मला जाणवू लागला, हे कळलचं नाही.

                 ह्या लेक्चरमध्ये अनेक गोष्टी कळल्या. ज्याचा अवलंब केला असता खरचं मलाही फरक कळून आला. आधी माझा सकाळचा नाश्ता Regularly झालाच पाहिजे, असा नियम नव्हता. नुसता चहा घेतला की माझा नाश्ता आटोपला जायचा. पण डॉ. अनिरुद्ध (बापू) ह्यांनी सकाळच्या नाश्याचे महत्त्व पटवून दिले. कारण आपण साधारण रात्री ९ वाजता जेवल्यावर रात्री झोपण्यानंतरचा काळ आणि सकाळचा उठल्यानंतरचा काही वेळ आपल्या पोटात अन्न नसते. त्यामुळे नाश्ता केल्याने शरीराला उर्जा मिळते आणि त्यामुळे ताजेतवाने होण्यासाठी मदत होते. मग माझ्या सकाळच्या नाश्त्यात २ पोळ्या आणि भाजी किंवा इडली, ढोकळा व चहा असतो. आणि ऑफिसला निघताना दुध असतं.

              आधी नाश्ता कधी एकदा केल्यावर direct मी जेवायचो. पण ते ही उशीराच. पण आता नियमाने ऑफिसला गेल्यावर कोणतेही एक फळ किंवा बिस्कीटचा पुडा असतोच.

              त्यानंतर एकाच जागी काम करुन करुन मध्ये मध्ये पाणी पित राहण्याची सवयही ह्याच लेक्चरमुऴे लागली. दिवसातून ३½ ली. पाणी प्यायले जाते. ज्यामुळे पचनसंस्था नीट राखली जाते. त्वचेवर तजेला जाणवतो आणि त्वचा कोणत्याही ऋतूमध्ये खरखरीत होत नाही. हा नियमीत योग्य पाणी पिण्याचा मला झालेला फायदा आहे.

              संध्याकाळी ही काही ना काही नाश्ता पोट भरून करण्याची सवय लागली. आणि रात्री परत जेवण. खाण्या-पिण्याच्या योग्य वेळा ठरल्यामुळे आता त्या वेळेत जरा कुचराई झाली तरी भूक ही जाणवतेच. योग्य खाल्ल्याने काम करण्याचा उत्साह आणि ऊर्जा नक्कीच मिळते, ह्यात तिळमात्र शंका नाही.

               वजन न वाढण्याचा बाऊ माझ्या मनात खूप होता. Healthy असणं म्हणजे तब्येतीने भरलेलं असण, असा माझा भ्रम होता. पण त्या भ्रमाचा समूळ नाश डॉ. अनिरुद्ध (बापू) ह्यांनी केला. किती Healthy दिसण्यापेक्षा तुम्ही किती Healthy आहात, आणि ते स्वतःला किती जाणवतय, हे बघायला शिका.. हे वाक्य मनात घर करुन आहे. लठ्ठपणाने येणारे आजार बारिक असल्यावर येत नाहीत असं नाही, तरी त्या बारिक पणामध्येही आपण कसे आणि किती स्वतःला Healthy ठेवू शकतो, हे ह्या लेक्चरमुळे मला समजले.

               ह्या "आपले आरोग्य" लेक्चरमुळे शरीराला लागलेले वळण, शिस्तबद्धता जेव्हा आपल्याला स्वतःला जाणवते, आणि आपलं मनं जेव्हा सांगतं.... की, होय.... मी Healthy आहे. आणि मी Healthy अधिकाधिक बनेन.

अजून ही ह्या लेक्चरप्रमाणे स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचा माझा प्रयास अजून सुरु आहेच. "थेंबे थेंबे तळे साचे" ह्या म्हणीनुसार हळूहळू मार्गक्रमण चालूच ठेवणार आहे. मला खात्रीच आहे, माझ्या ह्या प्रयासांना बळ पुरवण्यासाठी आणि मला पुर्ण आयुष्य निरोगी ठेवण्यासाठी श्रीदत्तगुरु आणि आदिमाता चण्डिकेचा कृपाहस्त माझ्या शिरावर आजन्म असणारचं आहे.

प्रणिल टाकळे